शबनम न्युज | मुंबई
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
Advertisement
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण यांनी सहकार, शिक्षण यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांचा राज्याच्या विकासात मोठा वाटा असून त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करीत आहे. त्यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत असल्याचेही देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी पालकमंत्री देसाई यांनी येथील भजन कार्यक्रमास उपस्थिती लावली.
Advertisement