शबनम न्युज | पिंपरी
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची अंतोदय संकल्प पूर्ती व्हावी तसेच देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव भारत संकल्पनेतील सबका सबका साथ सबका विकास या उपलब्धतेसाठी संविधान दिनानिमित्त पिंपरी विधानसभा क्षेत्रातील चर्मकार समाज बांधवांचे स्नेह संमेलन काल संत तुकाराम नगर परिसरातील संत रोहिदास महाराज मंदिर येथे संपन्न झाले.
चर्मकार समाजातील गटई कामगार यांच्या अनेक समस्या आहेत, शासनाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत परंतु समजातील शेवटच्या घटकाला त्याचा लाभ मिळत नाही. स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकायचे असेल तर युवकांच्या कौशल्य विकास व उद्योजकता विकास याविषयी आपल्या विशेष लक्ष देण्याची गरज आहे. समाज बांधव म्हणून आपण जर संघटीत झालो तरच आपल्या समस्यांचे निवारण आपण करू शकतोत. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदेव कार्यरत राहील असे भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव व कार्यक्रमाच्या संयोजक तेजस्विनी कदम यांनी सांगितले.
तेजस्विनी कदम यांच्या सारखी उच्च शिक्षण युवती आज भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात काम करत आहे. महिला असून स्व मर्यादित विचार न करता समाजाच्या समस्या निवारणासाठी ती पुढे येत आहे. तेंव्हा आपण सर्वांनी अशा युवकांच्या पाठीशी उभे राहून चांगले राजकीय नेतृत्व उभारणीसाठी साथ दिली पाहिजे असे आवहान भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडे यांनी केले.
या प्रसंगी लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष व स्वावलंबी भारत अभियान या संस्थेचे जिल्हा संयोजक राहुल खोले उपस्थित होते. त्यांनी चर्मकार बांधव यांच्या उद्योजकता विकास, यासाठी आवश्यक शासकीय परवानगी दाखले कसे काढायचे या विषयी सविस्तर माहिती दिली. विश्वकर्मा योजना नोंदणी प्रक्रिया, त्यासाठी आवश्यक पात्रता, संत रोहिदास चर्मकार महामंडळ यांच्या योजनांची माहिती देखील सर्व उपस्थितांना देण्यात आली.
या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थी म्हणून आपण एक पाऊल टाका आम्ही आपल्या साठी दोन पाउल टाकू, शासकीय पातळीवर आपल्याला कुठेही अडचण निर्माण झाल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करा सरकार पक्ष प्रतिनिधी म्हणून सर्व परीने आम्ही आपल्या सोबत आहोत असे भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे यांनी सांगितले.
या वेळी चर्मकार महामंडळ च्या रत्नमाला गायकवाड, भाजपा पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा सुजाताताई पलांडे, शहर चिटणीस महेंद्र बाविस्कर, पिंपरी विधानसभा विस्तारक नंदू कदम, रोहिदास मंदिर विश्वस्त सत्यवान भोईट इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन राष्ट्रीय कर्तव्य अभियानाचे संयोजक विजय वरुडकर यांनी केले तर आभार महिंद्र बाविस्कर यांनी केले.