शबनम न्यूज , प्रतिनिधी :
उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी उद्योजकांनी राजकारणात यावे असे प्रतिपादन अभय भोर यांनी केले भोर यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे सांगितले आहे कि .कोणतेही सरकार आले तरी उद्योजकांचे समस्या जैसे थे तैसेच आहेत पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते या शहराला एमआयडीसी परिसरातून मोठ्या प्रमाणात कर ही दिला जातो एमआयडीसी परिसरातील नामवंत कंपन्या मोठ्या प्रमाणात सीएसआर निधी सुद्धा महानगरपालिकेला देत असतात परंतु औद्योगिक क्षेत्रासाठी त्याचा कधीच वापर करण्यात आला नाही.
प्राथमिक मूलभूत गरजा कचरा समस्या ड्रेनेज रोड लाईट फूटपाथ आरोग्य कामगारांसाठी वाहतूक व्यवस्था पूर्णतः निर्माण करण्यात आलेली नाही अनेक भागात आपल्या कंपन्या सुरक्षित ठेवण्यासाठी प्रोटेक्शन मनी स्थानिक भाईंना द्यावा लागतो नाही तर कंपन्यांमध्ये चोरी, भीती असते काही कंपन्यांना लेबर कॉन्ट्रॅक्ट साठी वटणीला धरले जाते आजही विजेच्या समस्यांसाठी अनेक वेळा वीज बंद राहिल्यामुळे अनेक उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते कामगार बसून राहतात परंतु उद्योजकांना यातून बाहेर काढण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना राजकारणात येणे गरजेचे आहे परंतु गेल्या पन्नास वर्षात आजही उद्योग क्षेत्रामध्ये उद्योजकांना आपला हक्क विकत घ्यावा लागतो
राजकीय पक्षांना उद्योजकांचा फक्त निधी मिळविण्यासाठी वापर करता येतो परंतु उद्योजकांच्या मूळ समस्यांना पूर्णतः दुर्लक्षित केले जात असून त्यामुळे राज्यातील उद्योग हे अडचणीत आले असून बाहेरच्या उद्योगांना प्राधान्य आणि स्थानिक उद्योगांना दुर्लक्ष या परिस्थितीमुळे उद्योजकांचे अनेक प्रश्न आहे तसेच आहेत एमआयडीसी परिसरामध्ये उद्योजकांना मूलभूत सुविधांपासून आजही वंचित रहावे लागते उद्योग क्षेत्रामध्ये सर्व सुविधा विकत घ्याव्या लागतात ही परिस्थिती बदलण्यासाठी उद्योजकांनाच आता राजकारणामध्ये यावे लागेल नक्कीच त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसी आणि इतर परिसरातील उद्योजकांना त्यांचा न्याय आणि हक्क मिळू शकेल असे अभय भोर यांनी आज प्रसिद्धिपत्रद्वारे सांगितले.