शबनम न्युज | रायगड
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. आजच्या अंतरीम अर्थसंकल्पात महिलांचा विकास, शेतकरी ,गरीब कल्याण, रोजगार या सगळ्यावर भाष्य करण्यात आलं. तसेच टॅक्स, लॅब जैसे थे ठेवण्यात आला आहे. या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे टोप्या घालण्याचा प्रकार त्यांनी म्हटल आहे. त्यांनी रायगड मधल्या पेण या ठिकाणी भाषण करताना अर्थसंकल्पावर काढून टीका केली.
ते म्हणाले, मी आज पेण मध्ये असताना, मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शेवटचा अर्थसंकल्प आहे, हे लक्षात घ्या. निर्मला सीतारमन यांनी जड अंतकरणाने कार्य पार पाडलं. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. त्या महिलांकडे लक्ष देत आहात, मणिपूर मध्ये का गेला नाहीत? त्यांना सांगा आमच्या देशात महिला आहेत. हे आम्हाला माहीत नव्हतं. पण निवडणुकांमध्ये महिलांची मत हवी आहेत, म्हणून आम्ही सांगतो आहोत की, आता महिलांसाठी काम करणार. बिलकिस बानोकडे जा. त्यांच्या अत्याचारांना सोडलं होतं, त्यांना सांगा आम्ही तुझ्यासाठी काम करणार आहोत. शेतकऱ्यांनी जेव्हा वर्षभर आंदोलन केलं त्यांना तुम्ही अतिरेकी ठरवलं होतं. आता अतिरेक्यांना शेतकरी समजत. हा सगळा भुलभुलय्या आणि थोतांड आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
मी सगळ्या अर्थसंकल्प पाहिला नाही. पण हायलाइट्स मध्ये वाचलं की, देशात आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींसाठी काम करणार आहोत. मी अर्थमंत्र्यांचा अभिनंदन करतो. कारण त्यांनी पंतप्रधान मोदींसमोर हे बोलण्याचे धाडस केलं. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हे त्या बोलल्या. निवडणुका आल्यानंतर ही त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं की, देशात फक्त तुमचे सुटा बुटातले मित्र नाहीत, तुमच्या मित्रांच्या पलीकडे सुद्धा देश आहे. ज्या तरुण ,महिला, शेतकरी आणि गरीब आहेत, दहाव्या वर्षी या चार जाती तुम्हाला कळल्या. तुमच्या बरोबरचे अदाणी म्हणजे देश नाही. सुटाबुटातलं सरकार आता गरीबांकडे लक्ष द्यायला आलं आहे, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.