शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्याच सहकार्यांनी आरोप केले. या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले आहे.
ते म्हणाले, मला संपवण्याचे कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनी रचले आहे, त्यांच्याच माध्यमातून वेगवेगळी लोकं पुढे करून माझ्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. फडणवीसांना माझा बळीच हवा असेल, तर मी आज त्यांच्या सागर बंगल्यावर येतो, त्यांनी मला ठार करावे, मी सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार आहे, अशी घोषणा देखील जरांगे पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करायलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस हेच विरोध करत असल्याचा दावाही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आता मनोज जरांगे पाटील हे सरकारने सगेसोयरांबाबत काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी उपोषण करत आहे. मात्र, या उपोषणादरम्यान, त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याने सरकारमधील नेत्यांबद्दल आक्षेपार्य भाषा वापरल्या आहेत. तसेच त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अवमान केल्याचे सांगत त्यांचे एकेकाचे सहकारी असलेल्या अजय महाराज भास्कर यांनी मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत, या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हल्लाबोल केला आहे.