शबनम न्युज | पुणे
बंद उद्योग पुनर्जीवित करण्यासाठी शासनाकडून उद्योजकांना कोणतीच मदत नाही, यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक आजी-माजी खासदाराला याचे उत्तर द्यावे लागेल की त्यांनी औद्योगिक क्षेत्रासाठी काय कामे केली असे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी आज प्रसिद्धी पत्राद्वारे आपले मत मांडले.
शहरामध्ये कोविड नंतर अनेक लघुउद्योग मोठे उद्योग आर्थिक टंचाईमुळे बंद पडलेले आहेत . अल्यामुळे अनेक उद्योग बंद आहेत आणि त्यावर आधारित असलेले कामगार वर्ग आज बेकार अवस्थेमध्ये अनेक उद्योगांकडे नामांकित कंपन्यांच्या वेंडरशिप सुद्धा आहेत परंतु खेळते भांडवल उपलब्ध होत नससून शासनाकडून कोणतीही योजना बँका बँका अर्थात साहाय्य देण्यास नकारघंटा देतात ५९ मिनिटात पंतप्रधानांनी जाहीर केलेली योजना कागदावरच दिसून येते त्याचा प्रत्यक्ष लाभ उद्योगांना होताना दिसत नाही वास्तव्यात कायद्यामध्ये तशी तरतूद आहे परंतु त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून खाजगी सावकारांचे दडपण मोठ्या प्रमाणात उद्योगांवर असून आपले उद्योग काम असून सुद्धा वाढविण्यासाठी त्यांना कोणतीच संधी मिळत नाही त्यामुळे अनेक उद्योजक हे चिंताग्रस्त असून त्यांना आपल्या कंपन्या विकण्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही वारंवार अर्थसंकल्पामध्ये आजारी उद्योगांना पुनर्जीवित करण्यासाठी असोसिएशन तर्फे देखील मागणी करण्यात आलेली आहे परंतु शासनाने दिलेल्या योजना संबंधित अधिकारी आणि बँका या जुमानत नसून उद्योग आजारी का पडला याची कारणामेंचा न जाणता त्याला तात्काळ नकारघंटा दिली जात असल्याचे अनेक उद्योजकांच्या तक्रारी आहेत राज्य शासन केवळ नवीन उद्योग महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्नशील असतात परंतु आधीच्या उद्योगाकडे किंवा ते उद्योग का बंद पडले आहेत त्याकडे लक्ष देण्यासाठी ना शासनाला वेळ न संबंधित अधिकाऱ्यांना वेळ अशीच परिस्थिती महाराष्ट्र राज्यात राहिल्यास परराज्यातून आलेले उद्योगांनी स्थलांतर केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बेकारीचे कुऱ्हाड मोठ्या प्रमाणात कोसळणार असून महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र हे नामशेष होण्यास सुरुवात होईलयंदाच्या निवडणुकीत प्रत्येक आजी-माजी खासदाराला याचे उत्तर द्यावे लागेल की त्यांनी औद्योगिक क्षेत्रासाठी काय कामे केली असे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी आज प्रसिद्धी पत्राद्वारे आपले मत मांडले.