शबनम न्यूज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात एक कोटी 42 लाख 36 हजार नळजोडण्या देण्याचे उद्देश असल्याचे महा विकास आघाडी सरकार वतीने सांगण्यात आले आहे त्यानुसार जल जीवन मिशन अंतर्गत वर्ष 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात एक कोटी 42 लाख 36 हजार नळ जोडणी देण्याचे चे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने कार्यक्रम आखण्यात आले आहे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आले असून त्यासाठी सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, याबाबतची माहिती मुख्यमंत्री यांनी स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंट द्वारे दिली आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत वर्ष २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखत त्याची सर्व यंत्रणांनी युद्ध पातळीवर अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहेत. pic.twitter.com/nNyromTiwk
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 3, 2021