राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस आमदारांची बैठक संपन्न
शबनम न्यूज | मुंबई (वृत्तसंस्था)
महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र काँग्रेसच्या आमदारांची मंगळवारी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील होते. बैठकीला काँग्रेसचे ४४ पैकी ४२ आमदार, नाना पटोले, अशोक चव्हाण आदींसह उपस्थित होते.
सर्व आमदार काँग्रेस प्रदेशाध्याक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात आहेत. आमदरांचा फोन नॉट रिचेबल येत असल्याच्या अफवा असल्याचा खुलासा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला होता. सर्व काँग्रेस आमदारांना लवकरच सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असून कोणत्या आमदाराने बंड करु नये यासाठी त्यांचे लाईव्ह लोकेशन पक्षांच्या नेत्यांना पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Maharashtra Congress MLAs meet to discuss political situation
Read @ANI Story | https://t.co/A5b1CV2NhK#Maharashtra #MaharashtraPoliticalCrisis #Congress #TrendingNow pic.twitter.com/u20c3JULEw— ANI Digital (@ani_digital) June 22, 2022
Advertisement
पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार “अगम्य” होऊन गुजरातच्या सुरतला गेले आणि सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाल्याच्या वृत्तानंतर ही बैठक झाली.दरम्यान, बंडखोर पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३३ शिवसेना आणि सात अपक्ष आमदार बुधवारी भाजपशासित आसाममधील गुवाहाटी येथील एका लक्झरी हॉटेलमध्ये पोहोचले. शिवसेनेतील बंडखोरीमुळे मविआ सरकार पाडण्यासाठी शिंदे यांच्यासह इतर आमदार भाजपमध्ये सामील होतील अशी शक्यता बळावली आहे.
आमदारांचा मुक्काम आता शहरातील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहे. येथे एकूण ४० आमदार उपस्थित आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व घेऊन जाणार आहोत, असे शिंदे यांनी गुवाहाटी येथे आल्यानंतर सांगितले.