शबनम न्युज | मुंबई
“काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं….” असा टोमणा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे. तसेच “उशिरा का होईना महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. आता राज्याचे प्रश्न सोडवावे. ज्यांच्याबद्दल काही बोललं जातं, क्लिनचीट मिळाली नाही त्यांनाही मंत्रिमंडळात घेतलं जातं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
आज राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. एकनाथ शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्य मंत्रिमंडळाचा गेले ३८ दिवस रखडलेला विस्तार आज सकाळी पार पडला.सध्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही महिला आमदाराला संधी देण्यात आली नाही. अशा पुरुष प्रधान मंत्री मंडळाचा शपथ विधी मोठ्या उत्साहात पार पडला.
Advertisement