शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील ज्ञानेश्वर कॉलनी व भंगारवाड़ी या परिसरातील रस्ता डांबरीकरण करा, अशी मागणी निखिल दळवी ( संस्थापक/अध्यक्ष – विठ्ठल प्रतिष्ठान) यांनी मा.मुख्य समन्वय अधिकारी जनसंवाद सभा अ क्षेत्रिय कार्यालय निगड़ी पुणे – ४४ यांना केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक – १४ मधील ज्ञानेश्वर कॉलनी व भंगारवाड़ी या परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत दीड वर्षा पहिले सदर रस्ता ड्रेनेज लाईन टाकन्यासाठी खोदला होता ड्रेनेज लाईन टाकून झाल्यावर वरच्या वर प्याच मारून तातपुरत्या स्वरुपात बुजावन्यात आले रसत्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही त्या मुळे रस्ता वर खाली झाला आहे या आधी आम्ही सदर परिसरातील स्थानिक नागरिक व स्थानिक व्यापारी वर्ग यांच्या वतीने दिनांक – १०/०९/२०२२ रोजी मा.आयुक्त साहेब यांना ४० नागरिकांच्या सही व फोन नंबर असलेले तक्रार निवेदन दिले होते त्याची प्रत – संबंधीत कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग अ क्षेत्रिय कार्यालय निगड़ी यांना दिले होते पण तक्रार निवेदन देऊन ७ महिने होऊन सुद्धा सदर परिसरातील रसत्याचे डांबरी करण करण्यात आले नाही, असेही सदर निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.