शबनम न्युज | मुंबई
आज जेष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उपस्थित असलेले नेते आणि कार्यकर्ते भावनिक झाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, अनेक स्तरावरून शरद पवार यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. मात्र अजित पवार यांनी शरद पवार यांच्या या निवृत्तीच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केला आहे.
ते म्हणाले, “एक वेळ अशी आली, घाणेरडे आरोप-प्रत्यारोप झाले, राजकारण याचा उबग येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी देखील तेच केलं आहे. परंतु जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत.”
दरम्यान, संजय राऊत यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, भाकरी फिरवण्याचे संकेत होते..पण तवाच फिरवला.. शरद पवार काही दिवसांपूर्वी एका भाषणात म्हणाले होते की, भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. त्यावरून संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे.
जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला.शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि… pic.twitter.com/YwVVgrrWiN— Sanjay Raut (@rautsanjay61) May 2, 2023
Advertisement