मुंबई : ईडीच्या चौकशीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांची संवाद साधला यावेळी चौकशीनंतर आपणास कोणाकोणाचे फोन आले तसेच अजित दादांचा फोन आला का असा सवाल करण्यात आला होता त्यावेळी मला त्यांचा फोन आला नाही असं स्पष्टपणे जयंत पाटील यांनी सांगितलं, जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीची चर्चांना ऊत आला होता
यानंतर अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट केलं पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न केला असता पवार म्हणाले की ज्यावेळी पासून आम्ही सत्तेत आहे कुठल्या व्यक्तीच्या संदर्भात मी वक्तव्य केलं ? पाटील यांना एकट्यालाच ईडीने चौकशीसाठी बोलावलं नाही याआधी त्यांनी छगन भुजबळ यांना बोलावलं होतं त्यावेळी मी काही वक्तव्य केलं असेल तर मला दाखवा अनिल देशमुख यांना देखील बोलावलं होतं त्यावेळी मी काही वक्तव्य केलं असेल तर ते दाखवा प्रफुल्ल पटेल यांचे वेळी मी काही बोललो असेल तर दाखवा तुम्ही जाणीवपूर्वक काही वेगळे अर्थ काढण्याचा प्रयत्न करत आहात असं अजित पवार म्हणाले तर पुढे बोलताना ते म्हणाले की आतापर्यंत कोणाच्याही बाबतीत कोणतेही वक्तव्य केलेले नाही माझ्याही बाबतीत आयकर विभागाने 22 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या त्यावेळी काय बोलायचं ते मी बोललो होतो त्यानंतर पुन्हा मी माझ्या कामाला लागलो असही पुढे अजित पवार म्हणाले तपास यंत्रणांना चौकशीचा अधिकार आहे भाजपमध्ये गेलेल्यांची चौकशी होत नाही सूडबुद्धी ने चोकशी लावली जात आहे कोणत्याही नेत्याच्या चौकशीवर मी प्रतिक्रिया देत नाही फोन कशाला करायचा मी जेव्हा जयंत पाटील यांना भेटेल तेव्हा मी त्यांना बोले असेही अजित पवार म्हणाले