शबनम न्यूज | मुंबई
“जर निर्णय घेता येत नसेल तर राजकारणातून संन्यास घ्यावा,” असा खोचक सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
राऊत म्हणाले, गोपीनाथ मुंडे असते तर नक्कीच शिवसेना भाजपाला वेगळी दिशा मिळाली असती. आज जे चित्र दिसते ते नसते, मुंडे नसल्याने आज त्यांच्या कुटुंबाची राजकारणात वाताहात केली जात आहे, हे स्पष्ट दिसते. अशा परिस्थितीत परिवारातील प्रमुख व्यक्ती जी राजकारणात आहे, त्यांनी सहसाने हिमतीने परिणामांची परवाना करता निर्णय घेणे गरजेचे असते, जर निर्णय घेता येत नसेल तर राजकारणातून संन्यास घ्यावा, असा टोला राऊतांनी पंकजा मुंडे यांना लगावला आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा महाराष्ट्रात उभी करण्यासाठी रक्ताचे पाणी केले. महाराष्ट्रातल्या भाजपाला अच्छे दिन दाखवले. अनेक बहुजन समाजातील नेते ज्यांनी भाजपा महाराष्ट्रातून शून्यातून उभी केली. त्या मुंडे कुटुंबाचे अस्तित्व महाराष्ट्राच्या राजकारणात राहू नये यासाठी दिल्लीत आणि इथं प्रयत्न सुरू आहेत. पंकजा मुंडे यांचा पराभव का आणि कसा झाला हे सांगण्याची गरज नाही. मुंडे कुटुंबाबद्दल आमच्या मनात आस्था आहे. गोपीनाथ मुंडे असते तर आज जे चित्र असते ते दिसले नसते. मुंडे कुटुंबाची राजकारणात वाताहात केली जातेय. परिणामांची पर्वा न करता निर्णय घेणे अपेक्षित आहे. तरच तुम्ही राजकारणात टिकू शकता तुम्हाला निर्णय घेता येत नसेल तर राजकारणातून सन्यास घ्यावा, आमच्यावर अन्याय होतोय या रडगाण्याला कुणी विचारत नाही असं विधान त्यांनी केले.