शबनम न्युज | पुणे
पुणे शहरातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर विश्वचषक स्पर्धेतील 5 सामने होणार आहेत. 27 वर्षानंतर पुण्यात विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे तब्बल पाच सामने होणार आहेत. पुण्यात विश्वचषक स्पर्धेतील या आधीचा शेवटचा सामना 20 फेब्रुवारी 1996 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध केनिया यांच्यात नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. त्यामुळे पुणेकरांना यंदा जल्लोष करण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात केली असल्याचे सांगितले. भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यांशिवाय इतर चार सामने पुण्यात होतील.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला आणि पर्यायाने पुण्याला विश्वचषक आयोजनाची संधी दिल्याबद्दल आम्ही बीसीसीआयचे सचिव जय शहा, बीसीसीआय यांचे आभार मानतो. अन्य राज्य संघटना देखील या सामान्यांच्या आयोजनासाठी प्रयत्न करत होत्या, परंतु बीसीसीआयने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आयोजन क्षमतेवर विश्वास दाखविला, असे रोहित पवार म्हणाले. तसेच पवार यांनी बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, खजिनदार आशिष शेलार, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचेही आभार मानले.
तसेच गहुंजे मध्ये होणारे पाच सामन्यांमधील चार सामने दुपारी दोन वाजता सुरू होतील तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांगलादेश सामना सकाळी साडेदहाला सुरू होईल.
पुण्यात होणारे सामने –
१९ ऑक्टोबर : भारत वि. बांगलादेश
३० ऑक्टोबर : अफगाणिस्तान वि क्वालिफायर
२१ नोव्हेंबर : न्यूझीलँड वि. दक्षिण आफ्रिका
८ नोव्हेंबर : इंग्लंड वि. क्वालिफायर
१२ नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश.