शबनम न्युज | मुंबई
आज सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे पुढील पाच दिवस मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. पावसामुळे मुंबईतील पश्चिम द्रुगती मार्गावर बांद्रापासून ते अगदी अंधेरी पर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. अंधेरी, बोरिवली दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा पश्चिम द्रुगती मार्गावर पाहायला मिळत आहेत. तसेच ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे.
हवामान खात्याच्या वतीने पुढील तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. पुढील चार ते पाच दिवस मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
Advertisement