शबनम न्युज | मुंबई
राज्यात जी राजकीय परिस्थिती आहे, त्यात राज्याच्या विकासाला महत्त्व द्यायला हवे, हे माझे व माझ्या सहकाऱ्यांचे मत त्यामुळेच राष्ट्रवादीने सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. असे मत उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडले आहे.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला मजबुतीने पुढे नेत आहेत. तसेच राज्यातही मजबूत नेतृत्वाची गरज आहे. मी आजपर्यंत विरोधी पक्ष नेते पदावर काम करत आलो आहे. शुक्रवारी मी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला. मी माझ्या सहकाऱ्यांसमोर माझा निर्णय सांगितला. माझ्या सहकाऱ्यांनी ही तो मान्य केला. भविष्यकाळात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, व राज्याचा विकास हेच आमचे काम राहणारन असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले कि, केंद्रीय निधी महाराष्ट्राला कसा मिळेल यासाठी काम करणे यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहे राष्ट्रवादी पक्षाच्या नावानेच व घड्याळ चिन्हानेच आम्ही पुढील निवडणूक लढविणार तसेच नागालँड मध्येही आमचे सात आमदार निवडून आले होते त्यांनीही भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला पक्षाची मान्यता घेऊनच सगळे आमदार सरकार सोबत गेले.
जर आम्ही शिवसेने सोबत जाऊ शकतो तर भारतीय जनता पार्टी सोबत ही जाऊ शकतो. सर्व घटकांना न्याय देण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. तसेच राष्ट्रवादी पक्ष हा वाढविण्यावर आम्ही आमचे सर्व सामर्थ्य पणाला लावणार तसेच राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आमदार लोकप्रतिनिधी यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. त्यांनीही आमचा निर्णय मान्य केला आहे. आणखीन काही राष्ट्रवादीचे आमदार परदेशी गेले ते आज सायंकाळी मुंबईत पोहोचणार आहेत. तेही सरकारमध्ये सामील होतील, अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.