शबनम न्युज | आळंदी (वृत्तसंस्था)
शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुलामध्ये शरदचंद्र पवार कलावाणिज्य महाविद्यालय, ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, रामचंद्र पाटील औटी ज्युनिअर कॉलेज, आदित्य इंटरनॅशनल स्कूल, आणि राजा शिवछत्रपती विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या ३४ व्या
वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगी प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा.स्मिता वाघमारे यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हंसराज थोरात यांनी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाची ०९ ऑगस्ट १९८९ रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून तसेच फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासून स्थापना करण्या पाठीमागची भूमिका सविस्तर रेखाटली. तसेच रयत शिक्षण संस्थेचा उद्देश आणि श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या उद्देशामध्ये विचारप्रणालीच्या बाबत कसे साम्य आहे यासंदर्भात विविध उदाहरणाचे दाखले देत आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प. श्री. महंत पुरुषोत्तम दादा महाराज पाटील, भागवताचार्य आळंदीकर यांनी आपली भूमिका मांडतांना श्री गजाननमहाराज शिक्षण प्रसारक मंडळा अंतर्गत आळंदी मध्ये चालू असलेल्या विविध शाखा कशा यशस्वीपणे कार्यरत असून या शाखेच्या माध्यमातूनमहिलांसाठी शिक्षण सर्वांसाठी शिक्षण या उक्तीप्रमाणे कशाप्रकारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षणाच्या माध्यमातून गरुड झेप घेत आहेत या संदर्भात भाष्य केले. विद्यार्थ्यांनी जीवन जगतांना नकारात्मक जीवन न जगता कसे सकारात्मक जीवनाकडे मार्गक्रमण केले पाहिजे हे विविध अभंग व कविता मधून मार्गदर्शन केले.
या प्रसंगी व्यासपीठावर प्रामुख्याने प्रशासकीय संचालक मा. श्री राजीव पाटील, ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. प्रमोद इंगळे आणि आदित्य इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सौ.शितल पाटील यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष – विशाल विलासराव तांबे, सचिव – श्री वैभव विलासराव तांबे, आणि खजिनदार मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजीव कांबळे व प्रा. स्मिता वाघमारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजा शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक अतुल पानसरे यांनी मानले.
या कार्यक्रमाला सर्व शाखेतील विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी दिली.