शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरात त्यागमूर्ती माता रमाई स्मारक व्हावे याकरिता माता रमाई स्मारक समिती वतीने मागील 17 दिवसापासून शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. माता रमाई यांच्या स्मारकाचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा अन्यथा 15 फेब्रुवारी रोजी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा धुराजी शिंदे यांच्या वतीने देण्यात आला आहे.
स्मारक समितीचे अध्यक्ष धुराजी शिंदे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन होत असून वारंवार पाठपुरावा करूनही पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने याबाबत कोणतीही दखल घेतली जात, नाही याविषयी कित्येक वर्षापासून समिती वतीने मागणी करण्यात येत आहे, सध्या भिमसृष्टीसमोर 23 जानेवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे ,या आंदोलनाला 17 दिवस पूर्ण झाले तरीही मनपा वतीने त्याची दखल घेतली गेली नाही ,जागा आरक्षित असताना ती जागा पीएमपीएल साठी आरक्षित केली गेली, ती पी एम पी एल साठी आरक्षित केलेली जागा रद्द करून त्या जागी माता रमाईचे स्मारक व्हावे. आता कोणत्याही कारणासाठी वेळ घालवू नये अशी मागणी समिती वतीने करण्यात येत आहे, जर येत्या 14 फेब्रुवारी पर्यंत हा विषय सोडविण्यात आला नाही तर 15 फेब्रुवारी रोजी हजारोचे संख्येने आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा धुराजी शिंदे यांनी दिला आहे.