पिंपरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रिक्षासह मोर्चा काढत तिव्र आंदोलन
शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
Covid-19 मुळे गेली चौदा मनापासुन रिक्षा व्यवसाय बंद आहे, व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक अडचणी मध्ये आलेला रिक्षाचालक मालकांनी महाराष्ट्र मध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आत्महत्या केले आहेत, रिक्षाचे हप्ते थकल्यामुळे फायनान्स कंपनीच्या वतीने वसुलीसाठी बेकायदेशीर मार्गाने तगादा लावला जात असून बेकायदेशीर मार्गाने रिक्षा ओढून नेल्या जात आहेत, याबाबत पोलिसांकडे तसेच जिल्हाधिकारी आणि शासनाकडे सतत पाठपुरावाकेला, परंतु तक्रार देखील दाखल करून घेतली जात नाही, नेमकी दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला असून या सर्व परिस्थितीमुळे हतबल झालेल्या रिक्षाचालकांनी आज अत्यंत आक्रमक भूमिका घेत, पिंपरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढून फायनान्स कंपन्या विरोधामध्ये कारवाई करण्याची मागणी करत तीव्र आंदोलन केलं.
हि बातमी पण वाचा - Pimpri : रिक्षाचालक मालकांचे कर्ज माफ झाले पाहिजे अन्यथा आत्महत्या वाढतील - बाबा कांबळे
महाराष्ट्र रिक्षा पंचायत व रिक्षा ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
१) शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षाचालक मालकांचे आरसी बुक कोरे केले पाहिजे रिक्षाचालकांचे कर्ज माफ झालेच पाहिजे,
२) मा. सर्वोच्च न्यायालयाचा मनाईहुकूम असतानादेखील फायनान्स कंपनी कडून थकित हप्त्यासाठी रिक्षा ओढून नेल्या जात आहेत रिक्षा वडून नेणाऱ्या फायनान्स कंपनी वरती गुन्हे दाखल झालेच पाहिजे,
३) रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून रिक्षाचालकांना तातडीने प्रत्येकी महिना दहा हजार रुपये आर्थिक मदत मिळालीच पाहिजे,
४) रिक्षाचालक फेरीवाले बांधकाम मजूर असंघटित कामगार कष्टकऱ्यांसाठी टास्क फोर्स स्थापन करून त्यांचे नेमके प्रश्न समस्या सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे,
यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी-चिंचवड शहराचे कार्याध्यक्ष लक्ष्मण शेलार, उपाध्यक्ष सुरेश सोनवणे, रिक्षा ब्रिगेड महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब ढवळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष धनंजय कुदळे, उपाध्यक्ष विजय ढगारे, जाफर भाई शेख, अनिल शिरसाठ, हिरामण गवारे, संजय दौंडकर ,निखिल येवले ,तुषार लोंढे, अजय साळवे ,अभिजीत जाधव ,सोमनाथ आवारे, शिवाजी तापकीर ,शहानुर इनामदार ,श्याम इंगवले ,नबिलभाई शेख, अशोक रवींद्र लंके आदी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये दहापेक्षा अधिक रिक्षा चालक मालकांनी आत्महत्या केल्या आहेत कर्जाला कंटाळून आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या झाल्या आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या नंतर सरकारने उशिरा का होईना परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले त्यांचा सातबारा कोरा केला याच धर्तीवर रिक्षाचालकांचे कर्ज माफ करून त्यांचे आरसी बुक देखील पूर्ण कोरे होणे आवश्यक आहे, अन्यथा महाराष्ट्र मध्ये रिक्षाचालक मालकांच्या आत्महत्या वाढतील रिक्षाचालक मालकांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे.
रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा सरकारने अनेक वेळा केली परंतु अजूनही कल्याणकारी महामंडळ स्थापन झाले नाही ” रिक्षाचालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन झाले असते तरी आज याच मंडळामधून रिक्षाचालकांना आर्थिक लाभ मिळाला असता,
रिक्षाचालकांचे आंदोलन सुरू झाले असून या आंदोलनामध्ये कॅब ,टेम्पो ,बस ,ट्रक, डंपर व इतर वाहतूक दारांनी देखील या आंदोलनात सहभागी व्हावे आणि वाहतूकदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठे आंदोलन उभे करावे असे आव्हान देखील यावेळी बाबा कांबळे यांनी केले.