परिसरातील २१० कुटुंबाना मिळाले आरोग्याचे सुरक्षाकवच..!
शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
चिखली-कुदळवाडीत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना ‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत प्रभाग सदस्य दिनेश यादव यांच्या हस्ते बुधवारी (दि. १५) रोजी आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.
या योजनेत नोंदणी केलेल्या जवळपास २१० नागरिक व त्यांच्या कुटुंबावर वैद्यकीय सहाय्यतेअंतर्गत उपचार केले जाणार आहेत. या उपक्रमास प्रभाग सदस्य दिनेश यादव यांचे सहकार्य लाभले आहे. उपक्रमास रामकृष्ण लांडगे, रामभाऊ कोहिणकार, काका शेळके, प्रकाश चौधरी, अँड नितीन मोरे, मोईद शेख उपस्थित होते.
‘आयुष्मान भारत योजना’ ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना असून, वंचित घटकांना आरोग्य संरक्षण व हेल्थकेअरच्या माध्यमातून उपचार मिळवून देणे, हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. या योजनेमधून लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी ५ लाख रुपये इतकी रक्कम त्यांना त्यांच्या आरोग्य योजना मार्फत देण्यात येत असते, अशी माहिती दिनेश यादव यांनी यावेळी उपस्थितांना दिली.