शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ नोव्हेंबर ) :- कंगना रणावत या मागच्या वर्षी आपल्या पोलीस खात्याबद्दल ही पाक व्याप्तसारखे मुंबई पोलीस खाते झाले आहे असे शब्द वापरून आपल्या देशाच्या पोलीस खात्याचा अपमान आधी ही यांनी केला आहे ,काल परवा त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर श्रीमती कंगना राणावत यांचे पाय जमिनीवर नाहीत.. त्यांनी प्रसार माध्यमांसमोर भारताचा अवमान केल्याचे पत्रात म्हटले आहे. कंगना म्हणाल्या की, ‘1947 चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले होते त्यामुळे त्यांनी भारताचा अवमान केला आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे स्वातंत्र मिळविण्याकरिता महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांच्यासह आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांचा अपमान झाला आहे. त्यांच्या या निंदनीय वक्तव्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे श्रीमती कंगना राणावत यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचा आपण गांभीर्याने विचार करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी,कारण कला क्षेत्र वगळता श्रीमती कंगना राणावत या प्रत्येक क्षेत्रात नको त्या ठिकाणी आपले नाक खुपसून प्रसिद्धी झोकात राहण्याचा प्रयत्न करत असतात.आशा त्यांच्या बोलण्याने सगळी कडे संताप ची लाट होईल यासाठी आपण तिच्या वर गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी असे निवेदन पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश साहेब यांना दिले.