शबनम न्युज | पिंपरी
मालमत्ता हस्तांतर फी खरेदी विक्री व्यवहारांचे १/२ टक्के केल्याने शहरातील नागरिकांवरती मोठ्या प्रमाणात आर्थिक मुर्दंड पडत आहे. तरी या निर्णयाचा फेर विचार करावा, अशी मागणी पिं.चिं. मनपाचे मा. नगरसेवक राहुल कलाटे यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिं.चिं. मनपा करसंकलन कार्यालयातून ३१ मार्च २०२२ नंतरच्या मालमत्ता हस्तांतर फी खरेदी विक्री व्यवहारांचे १/२ टक्के केल्याने शहरातील नागरिकांवरती मोठ्या प्रमाणात आर्थिक मुर्दंड पडत आहे. तरी ह्या निर्णयाचा फेर विचार करून शहरातील नागरिकांना पूर्वी प्रमाणे कर योग्य मूल्याच्या ५ टक्क्याने प्रमाणे आकारणी करून दिलासा देण्यात यावा. पूर्वी खरेदी विक्री द्वारे मालमत्ता हस्तांतरण करताना सुमारे २००० रुपये पर्यंत भरावा लागत होता. परंतु ३१ मार्च २०२२ नंतर हि रक्कम जवळजवळ २० पटींनी वाढल्यामुळे ह्या निर्णयाचा फेरविचार करावा.
तसेच काही नागरिकांनी ३१ मार्च पूर्वी व्यवहार करून देखील त्यांना फक्त आपल्याकडे अर्ज नाही केला म्हणून १/२ टक्का रक्कम भरावी लागत आहे. करोना काळ तसेच जेष्ठ नागरिक व त्यांची मुले परदेशात असल्यामुळे त्यांच्या कडून नजर चुकीने जाहीर प्रकटनामुळे दुर्लक्ष झाल्या कारणाने त्यांना व मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे वरील हस्तांतर मूल्य तूर्तास ३१ मार्च २० हस्तांतरित केलेल्या लोकांना पूर्वी प्रमाणे आकारण्यात यावा. जेणेकरून काही प्रमाणात शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल तसेच हि अन्यायी कारक कर वाढ देखील लवकरात लवकर रद्द करण्यात यावी, असेही सदर निवेदनात कलाटे यांनी नमूद केले आहे.