शबनम न्युज | पिंपरी
चापेकर स्मारक समिती संचालित खिंवसरा-पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संस्कारभारती (पिंपरी-चिंचवड) प्रस्तुत ‘स्फूर्तिगान’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. संस्कारभारती (पिंपरी-चिंचवड) अध्यक्ष सचिन काळभोर, लीना आढाव, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पेंडसे, दीपश्री प्रभू, रजनी देशपांडे, विदुला पेंडसे, जया शिंगवी, चापेकर स्मारक समिती उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, डॉ. नीता मोहिते, अशोक पारखी, संजय कुलकर्णी, गतिराम भोईर, शाळा समिती अध्यक्ष नितीन बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्कारभारतीच्या साहित्य आणि संगीत विधांच्या अकरा महिला कलाकारांनी पोवाडा, भक्तिगीते, देशभक्तिपर कविता यांच्या सुरेल अन् प्रभावी सादरीकरणातून सन १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापासून ते १९४७ च्या स्वातंत्र्यचळवळीपर्यंतच्या रोमांचकारी काळाची अनुभूती देत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. शिक्षण संकुलाच्या आवारात विद्यार्थ्यांनी उभारलेल्या किल्ल्यांचे विधिवत पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. याप्रसंगी विक्रम कुसाळकर, चेताराम देवासी, रोहित पाठक, रोहन भारद्वाज यांना संस्थेला दिलेल्या आर्थिक मदतीसाठी आणि प्रमोद चक्रदेव यांना ग्रंथसंपदा भेट दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कागदी फुलांनी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सुनीता घोडे यांनी प्रास्ताविक केले. पालक शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेतील पहिल्या तीन महिला पालकांना महाराष्ट्राची शान असलेली पैठणी बक्षीस देण्यात आली. विजेत्या पालकांची नावे खालीलप्रमाणे :-
प्रथम क्रमांक :- नूतन गायकवाड,
द्वितीय क्रमांक :- अनिता बोधले,
तृतीय क्रमांक :- दुर्गा कोळी,
उत्तेजनार्थ :- कांचन गोळे, सुनीता क्षीरसागर, रमाबाई शिंदे; तसेच विजेत्या शिक्षकांची नावे खालीलप्रमाणे :-
प्रथम क्रमांक :- प्रमोदिनी बकरे,
द्वितीय क्रमांक :- सुवर्णा देशपांडे,
तृतीय क्रमांक :- स्मिता जोशी,
उत्तेजनार्थ :- नीता साळवे
कार्यक्रमाच्या संयोजनात मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर (माध्यमिक), मुख्याध्यापक नटराज जगताप (प्राथमिक), बालविभागप्रमुख आशा हुले, योगिनी शिंदे, माधुरी कुलकर्णी, अंजली सुमंत यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सीमा आखाडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोदिनी बकरे यांनी आभार मानले. “गर्जा महाराष्ट्र माझा…” या राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.