शबनम न्युज | आळंदी
प्रतिनिधी | मल्हार काळे
पोलीस चौकी ते आळंदी ग्रामीण रुग्णालय रस्त्यावरील बसल्यास विक्रेत्यांवरती होणार कारवाई आळंदी देवाची आळंदी नगरपरिषदेच्या कार्यालयात आज पालिका प्रशासन तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली भाजी मंडई संदर्भात बैठक आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पोलीस व वाहतूक विभाग अधिकारी आळंदी ग्रामीण रुग्णालय अधिकारी रिपब्लिकन सेना, दलित पॅसेंजर वंचित बहुजन आघाडी, सिद्धार्थ ग्रुप समस्त ग्रामस्थ व आळंदी भाजी मंडई विक्रेते टपरी, पाथरी, हातगाडी पंचायतीचे पदाधिकारी यांच्या समवेत संयुक्तपणे बैठक झाली.
अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्यामध्ये रिपब्लिकन सेना दलित पॅंथर वंचित बहुजन आघाडी व सिद्धार्थ ग्रुप पदाधिकारी संजीव रंधवे, रवींद्र रंजवे, विश्वजीत थोरात यांच्या वतीने इनाम वर्ग साब महार वतन सर्वे नंबर एक, दोन, तीन क्षेत्रावर आळंदी नगर परिषदेने अनाधिकृत केलेल्या अतिक्रमण बाबत प्रश्न उपस्थित केले. संबंधित जागेचा मोबदला देण्यात यावा, भाजी मंडई स्थलांतरित करावी, किंवा योग्य द्या टक्केवारी संबंधित जागेत जमीन मालकांना आम्हाला तिथे गाळे देण्यात यावी, पोलीस चौकी ते आळंदी ग्रामीण रुग्णालय रस्त्यावर भाजी विक्री त्यांनी बसू नये, यावेळी त्यांनी येथे सांगितले आळंदी पालिकेचे गाळा धारक भाडेकरू आहेत त्यांना नाम मात्रे भाडे असून, ते पोट भाडेकरू ठेवत आहेत पोट भाडेकरी घेऊन वीस हजार रुपये घेत आहेत. काही भाजी विक्री त्यांच भाजी मंडई मध्ये गाड्या असून त्यांनी तिथे पोट भाडे करू ठेवले आहेत. ते त्यांच्याकडून भाडे घेत आहेत असे विषयही उपस्थित वर्गाकडून बैठकीत सांगण्यात आले आळंदी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक उर्मिला ताई शिंदे यांनी आठवड्यात ग्रामीण रुग्णालयात किती रुग्ण येतात तसेच रुग्णांबरोबर यांचे नातेवाईक येतात त्यांची आकडेवारी त्यांनी सांगितली. रुग्णवाहिकेतून गर्भवती महिला प्रस्वतीसाठी येथे आणले जातात यासाठी येथील रस्ता का अतिक्रमणमुक्त असावा याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
यावेळी बोलताना, वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस अधिकारी शहाजीराव पवार म्हणाले, रस्त्यावर दूध दरबार पार्किंग होऊ नये, म्हणून प्रशासनाने वाहनांच्या पार्किंगसाठी आरक्षित जागेवरती सुसज्ज इमारत बांधून पार्किंगची व्यवस्था करावी, रस्त्यावरील दुतर्फा पार्किंगमुळे येथील गाडी उचलण्यासाठी व ती वाहने ठेवण्यासाठी ट्विंग व्हॅनची व्यवस्था करावी रस्त्यावरील अतिक्रमण मुख्यतेसाठी अतिक्रमण विभागातील व्यक्ती सदैव तत्पर रावा पालिकेतील अतिक्रमण विभागातील व्यक्ती कारवाई साठी हजर नसतात. शेतकरी बाजी विक्रेत्यांसाठी सुद्धा जागेची व्यवस्था करावी, ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावर भाजी मंडई बसते यावर या बैठकीत ठोस निर्णय घ्यावा.
डीडी भोसले पाटील म्हणाले, पोलीस चौकी ते आळंदी ग्रामीण रुग्णालय हा रस्ता हा परिसर अतिक्रमण मुक्त असेल तर बाकी विरोध नाही विरोध असेल तर आम्ही मोडून काढू तेथे बसणाऱ्या बाहेरील व्यक्तीवर पालिका प्रशासनाने कारवाई करावी, डी टी आर च्या मोबदल्यात काही जागा मालक जागा देण्यात तयार आहेत.
टपरी, पंढरी, हातगाडी पंचायत च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भगवानराव वैराट साहेब बळीराम काकडे पुणे जिल्हा अध्यक्ष मल्हार भाऊ काळे, आळंदी शहर मंडई अध्यक्ष राहुल कुराडे, गणेश काळे व इतर पदाधिकारी यांनी भाजी मंडई साठी आरक्षित असलेली जागा भाजी वगैरे त्यांना मिळावी किंवा जागा आरक्षित कराव्यात, ही भाजी मंडई असावी, लाईट नळ पाणी संडास बाथरूम याची व्यवस्था असावी, असे पुणे जिल्हा अध्यक्ष मल्हार भाऊ काळे यांनी सांगितले.
तसेच तिथे विविध सुविधा असाव्यात आषाढी कार्तिकी दरम्यान बाजी विक्रेत्यांचे स्थलांतर होते. त्यासाठी योग्य त्या प्रशासनाकडून उपाय योजना व्हाव्यात, आंदोलन करत या जमीन मालकांचे प्रश्न सोडवावेत, पोलीस चौकी ते आळंदी ग्रामीण रुग्णालय परिसरात जे बाजी विक्रेते व इतर विक्रेता बसेल त्यावर कारवाई करण्यात यावी, प्रकाश कुऱ्हाडे यावेळी म्हणाले, पालिकेने पूर्वी आरक्षण असलेल्या जागा ताब्यात घेतल्या व काही न घेतल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच येथील जागेवर आरक्षित करावी, पालिकेची नवीन इमारत नियोजन आहे माजी नगराध्यक्ष वैजंता उमर्गेकर भाजी मंडई व अतिक्रमण बाबत आपले मत व्यक्त केले.
माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे म्हणाले, आंदोलन कर द्या जमीन मोबदला करणार व बदला मिळावा प्रशासनाने सहकार्य करावे, समीर गोरे यांनी भाजी मंडई संबंधित विषयावर माहिती दिली.
मुख्याधिकारी कैलास केंद्रे यावेळी म्हणाले, पालिकेत नवीन रुजू झालो आहे तरी या बैठकीच्या माध्यमातून अनेक विषय कळाले, अनेक महत्त्वाचे विषय कळाले जिल्हाधिकारी यांच्याकडे आंदोलनकर्त्यांचे जमीन मालकांच्या मागण्यांचा जिल्हाधिकारी यांच्याकडे जमीन मालकांचा मागण्यांचा पालिकेमार्फत संबंधित चर्चा विषयी ठेवू प्रशासकीय पातळीवरती जेवढे शक्य प्रयत्न करणे शक्य आहे ते करू भाजी मंडईच्या पालिकेकडे वेळोवेळी तक्रारी येत होत्या. काही मोजक्या माणसा मार्फत आडकाठी केली जाते तिथे बसण्याचा हट्ट केला जातो ठोस निर्णयासाठी जागा उपलब्ध नाही त्यासंबंधी निर्णय झाला असता, शाळेकडे गेल्यानंतर पावसाळ्यात पुन्हा समस्या उद्भवणार परत स्थलांतर होणार त्यासाठी कायमस्वरूपी मंडई जागा आरक्षित करणे महत्त्वाचे मुद्दा आहे आरक्षण खाजगी व्यक्तीच्या जागेवरती आहे निधी सोयी सुविधा महत्त्वाच्या असतात त्या शासनाकडून मिळवाव्या लागतात भविष्यकाळात निवडणुकीनंतर प्रशासन व लोकप्रतिनिधी दोन ते तीन ठिकाणी भाजी मार्केटची व्यवस्था करावी, लागेल याची मानसिकता आत्तापासूनच ठेवावी लागेल.
तहसीलदार वाघमारे मॅडम यावेळी म्हणाल्या, प्रश्न तुम्हीच उपस्थित केले. उत्तरही तुम्हीच दिले. आळंदीकरांकडे जागरूकता आहे, तर हा वादाचा मुद्दा निघाला नाही पाहिजे. भाजी मंडईसाठी दीर्घकालीन सुविधा करावी लागेल, जिल्हाधिकारी समोर आंदोलन करत जा जमीन मालकांचा विषय मांडून शासनाकडून शक्य तेवढी मदत त्यांना मिळेल, हा न्यायालयीन लढा आहे. पुरुष शासनाकडून त्यांना सहकार्य लाभेल, भाजी मंडई संदर्भात एका व्यक्तीसाठी प्रशासन वेठीस धरत असाल तर ते कदापि चालू देणार नाही त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल पोलीस चौकी ते आळंदी ग्रामीण रुग्णालय रस्त्यावर कोणीही विक्रेता बसणार नाही. यावेळी या बैठकीत निर्णय झाला. यावेळी माजी नगरसेवक सचिन गिलबिले, प्रिय सोनवणे, रामदास दाभाडे, महेश जाधव, बाळू जाधव, जनार्दन भिसे, अशोक पांढरे, शिवाजी मुसळे व पालिका कर्मचारी वर्ग उपस्थित होते.