शबनम न्युज | पिंपरी
पवना जलमित्र हा समूह प्रामुख्याने पवना नदीच्या प्रदूषणावर नव्याने काम सुरु असून, 26 जानेवारी रोजी याची स्थापना झाली असून या समूहात समाजातील सर्व घटक सहभागी झाले असून, आज जागतिक जल दिन व गुढी पाडव्याचे निमित्त साधून पवनेच्या स्वच्छतेच्या संकल्पाची गुढी प्रथमच नदीपात्रात उभारली असून या निमित्त नदीच्या प्रदूषणाची पातळी, खराब होत चाललेले पाणी, घरगुती सांडपाणी यापासून होणारे प्रदूषण आणि इतर गंभीर समस्यांचे गांभीर्य सर्वापर्यत जाणे अभिप्रेत असून यातून जनजागृती होऊन नदी स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ कशी राहील यावर प्रामुख्याने लक्ष असणार आहे.
आज या पवित्र कार्यक्रमास जलदिंडी प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा श्री राजीवजी भावसार , सूर्यकांत मुथियान , नदीकट्टा चे संस्थापक श्री. सचिन काळभोर या मान्यवरांच्या हस्ते गुढी उभारून जलपूजन व पवनामाईची जलआरती चा कार्यक्रम संपन्न झाला .
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वरिष्ठ जलमित्र मा सुदामजी तरस ,सेजल जोशी ,गटाचे आधारस्तंभ अशोकजी तरस , राम तरस , दिपक तरस कुंडलिक आमले व परिवार , बापू कदम ,सचिन कुडले,किशोर जगताप, बापू कातळे, तुषार तरस, बाळासाहेब धुमाळ,विशाल तरस,देवेंद्र तरस नवनाथ तरस , रोहित बोरगे , सचिन गावडे ,मछिंद्र तरस , सुनील तरस , चैतन्य शेटे, पत्रकार गणेश धुडम व जलमित्र परिवाराचे अनेक बालमित्र उपस्थित होते.