शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
टिळक चौक ते दुर्गा नगर पर्यंत रस्त्याची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रसाद कोलते यांनी केली.
या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेक अपघातांच्या घटनाही घडलेल्या आहेत. यमुना नगर मधील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले.स्त्यावरती जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना गाड़ी चालवताना मोठी अडचण होत आहे.
“खड्ड्यात पाणी साचल्यामुळे नेमका रस्ता कुठे आहे. आणि खड्डा कुठे आहे. हे वाहन चालकांना अजिबात लक्षात येत नाही.” त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी महापालिकेने टिळक चौक ते दुर्गा नगर पर्यंत रस्त्याची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. अशी मागणी प्रसाद कोलते यांनी महापालिकेला पत्र लिहून केली आहे.