शबनम न्युज | मुंबई
कोडके लोकं राजीनामा देत नाही. जगभरात ही ज्या लोकांनी बेकायदेशीर राज्य केले, त्यांना हुसकावून बाहेर काढले आहे किंवा ते पळून गेले आहे, हा इतिहास सांगतो. हिटलरनेही राजीनामा दिला नाही तर त्याने आत्महत्या केली. माझी कुणावरही व्यक्तिगत मत नाही एकनाथ शिंदे सारखे खोटारडे राज्यकर्ते महाराष्ट्र राज्यावर राज्य करतायेत, अशा शब्दात ठाकरे यांच्या गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टोला लगावला आहे.
ते म्हणाले, आमचा लढा व्यक्ती विरोधात नाही, देशाचे संविधान वाचवण्यासाठी लढा आहे. देशातील लोकशाही कायदा, संसद, संसदीय लोकशाही घटनात्मक संस्था यांचे रक्षण करण्यासाठी 143 खासदारांनी स्वतःचे बलिदान दिले. हे विसरू नका. जे लोक एका व्यक्तीचे रक्षणासाठी उभे आहेत, त्यांनी स्वतःच्या अंतर आत्मा तपासून पहावा, या देशात सध्या जे चाललंय ते त्यांना मान्य आहे का असा सवाल संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना केला आहे.
याच लोकांचे पूर्वज म्हणजे पूर्वीचे नेते त्यांनी आणीबाणी विरोधात का लढा दिला होता, हे त्यांनी समजून घ्यावे, 143 खासदार आणि ज्या पद्धतीने मुंडकी उडवली आहेत का? यावर भाष्य करावे, लोकशाहीच्या मंदिराचे शमशान केले आहे. लोकशाहीचे रक्षणकर्ते त्यांचे बलिदान ज्यांनी दिले हे पाहता लोकशाहीचे मंदिर पायदळी तुडवली. त्यांना राम मंदिराचा सोहळा करून राजकारण करण्याचा अधिकार नाही, हे आमचे स्पष्ट मत आहे, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.