शबनम न्युज | हैदराबाद (वृत्तसंस्था)
प्रेमात व्यक्ती कोणतीही सीमा पार करू शकतो. असं म्हणतात की, प्रेम आंधळ असतं. परंतु प्रेमाचं रूपांतर वेडेपणात झाले, तर त्याचा त्रास वेगळाच असतो. असेच एक प्रकरण हैदराबाद मध्ये घडले आहे. हैदराबाद मध्ये एक टीव्ही अँकरच्या प्रेमात पडलेल्या युवतीने चक्क टीव्ही अँकरचे 4 सहकाऱ्यांसोबत मिळून अपहरण केलं.
हैदराबाद पोलिसांनी युवती तृष्णा हिने टीव्ही अँकर प्रणव सिस्टल याचे तिच्या चार सहकाऱ्यांसोबत मिळून अपहरण केले. युवतीने चार सह आरोपींना अपहरण करण्याची सुपारी दिली होती, तृष्णाने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. पोलिसांनी जेव्हा तृष्णाला प्रणवला अपहरण करण्याचे कारण विचारले असता, तिने दिलेल्या उत्तरावर त्यांनाही धक्का बसला. आरोपी युवतीला प्रणव सोबत लग्न करायचं होतं, यासाठी तिने प्रणवचे अपहरण केल्याचे तिने तपासात म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात म्हटले आहे की, डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या तृष्णाने मेट्रोमोनियम साइटवरून प्रणवचा प्रोफाइल पाहिला होता. त्यानंतर तिने प्रणव चा मोबाईल नंबर शोधला. जेव्हा तिने प्रणवला मेसेज द्वारे संपर्क केला, तेव्हा त्यानी कोणीतरी माझ्या फोटोचा गैरवापर केल्याचे म्हटले देखील आहे. प्रणवणे त्याबाबत सायबर क्राईम पोलीस ठाण्यातही तक्रार केली आहे.
तृष्णाने प्रणवचे अपहरण करण्याचे प्लॅनिंग आखले होते. त्यानुसार चार जणांना प्रणवच्या हालचालींवर नजर ठेवायला सांगितली. या चौघांनी प्रणवच्या कारवर ट्रेकिंग डिव्हाईस लावले होते. 10 फेब्रुवारीला आरोपींनी प्रणवचे अपहरण केले आणि एका ठिकाणी त्याला बेदम मारले. जिवे मारण्याच्या भीतीने प्रणव तृष्णा सोबत बोलण्यास तयार झाला. त्यानंतर प्रणवला सोडण्यात आले. मात्र, तृष्णा ही सतत प्रणवला मेसेज पाठवायची, सतत त्रास दिल्याने प्रणवणे तृष्णाला ब्लॉक केले होते. सतत प्रणव तिला दुर्लक्ष करत असल्याने ती नाराज होती. तृष्णाला कुठल्याही परिस्थितीत प्रणवशी लग्न करायचं हे तिने ठरवलं होतं. त्यामुळे तिने चक्क प्रणवचा अपहरण करण्याचा कट रचला आणि त्यानंतर देखील अपहरण करून त्याच्याशी लग्न करायचे मग सर्व काही सुरळीत होईल, असं तिला वाटत होतं.