शबनम न्युज | आळंदी श्री. गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या, शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुल आळंदी, डुडुळगाव, जि. पुणे. या ठिकाणी शिक्षणमहर्षी स्व. विलासराव...
शबनम न्युज | आळंदी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे येथे आजादी का अमृत महोत्सव...
शबनम न्युज | आळंदी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव आळंदी या ठिकाणी शारीरिक शिक्षण विभागाअंतर्गत वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व वैष्णवी पांचाळ, काजल पवार आणि विशाखा म्हसतकर यांच्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. संजीव कांबळे, परीक्षा विभाग प्रमुख यांनी महाविद्यालयात दि.०९/०५ /२०२२ ते १२ /०५ /२०२२ या काळात महाविद्यालयाअंतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असे सांगून या क्रीडा स्पर्धेत महाविद्यालयातील कला, वाणिज्य व बी.बी.ए ( सी.ए) या शाखेतील ३०० विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता तसेच नवीन खेळाडूंचे कौतुक व खेळाचा दर्जा वाढविणे हा कार्यक्रमाचा मूळ उद्देश महाविद्यालयाअंतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे म्हणजेच ऑलम्पिक स्पर्धेची पूर्वतयारी होय असे मत व्यक्त केले. यावेळी कबड्डी, खो-खो, चेस, गोळा फेक, रस्सीखेच, हॉलीबॉल व कॅरम या क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. रणजित कदम यांनी करून दिला.या प्रसंगी मा.श्री. रवींद्र पन्हाळे पोलीस उपनिरीक्षक रावेत, पुणे. यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तरुणाई व गुन्हेगारी याबद्दल मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी कोणत्याही धार्मिक व जातीय दंगलीत सहभागी न होता आपल्या कर्तृत्वाला महत्व दिले पाहिजे असे मत मांडून सोशल मीडियाचा वापर कसा करावा याबाबत विविध उदाहरणासह मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते पाटील सचिव – हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळ राजगुरुनगर,पुणे. यांनी महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा म्हणजे तरुणाईला जिवंत ठेवण्याचा कार्यक्रम असून स्वतःमध्ये बदल घडविण्याची सुवर्णसंधी आहे. असे मत व्यक्त करीत विद्यार्थी जीवनात स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मिळणे म्हणजे भावी आयुष्यासाठी प्रेरणा असून प्रत्येकाने स्वतःमधला मी शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तसेच शिक्षण घेत असताना आपल्याकडे कौशल्यावर आधारित शिक्षण असणे सुद्धा काळाची गरज असून जीवनात यशस्वी होण्यासाठी कला,साहित्य,क्रीडा, पत्रकारिता असे विविध क्षेत्र असून आपल्या आवडीनुसार प्रत्येकाने क्षेत्र निवडले पाहिजे. विद्यार्थीदशेत स्टेज,ग्राउंड व भाषा इत्यादींचे शिक्षण सुद्धा असणे आधुनिक काळात किती महत्त्वाचे आहे यावर भाष्य करीत कुटुंब व महाविद्यालय हे संस्कार देणारे घटक असून आयुष्यात आपल्या आत दडलेला उत्तम माणूस जन्माला आला पाहिजे असे मत व्यक्त करीत चांगला माणूस म्हणून आपल्याकडे चांगली दृष्टी हवी चांगली दृष्टी असेल तरच आपल्याला पूर्ण जग सुंदर दिसेल यासंदर्भात विविध उदाहरणासह विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केवळ यशस्वी होण्यापेक्षा यशस्वी माणूस होणे किती महत्त्वाचे आहे असे मत मांडून समाजात अनेक व्यक्ती धर्म,जात यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात या वादात विद्यार्थ्यांनी न अडकता आपल्या उज्वल भविष्याकडे मार्गक्रमण करण्याची गरज असून विद्यार्थ्यांचे खरे भविष्य त्यांच्या हातात असते हे विविध उदाहरणासह स्पष्ट केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विकास दिघे,शारीरिक शिक्षण संचालक यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला प्रा. माणिक कसाब, प्रा.शाहूराज येवते, प्रा.शैला वाळुंज, प्रा. डॉ. छाया जोशी,प्रा.यशोदा खुळखुळे, प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. सोनाली अभंग, प्रा. दिपाली सोनवणे,प्रा.विश्वनाथ व्यवहारे, प्रा. डॉ. राजू शिरसकर प्रा. प्रविण डोळस इत्यादी विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप बारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. कैलास अस्तरकर यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली. ...
शबनम न्युज | आळंदी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव आळंदी या ठिकाणी शारीरिक शिक्षण विभागा अंतर्गत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून देताना करतांना प्रा. विकास दिघे शारीरिक शिक्षण संचालक यांनी क्रीडा स्पर्धेची रूपरेषा मांडताना दिनांक ०९/०५/२०२२ ते १२/०५/२०२२ या कार्यकाळात कबड्डी, व्हॉलीबॉल, चेस, खो -खो, कॅरम, क्रिकेट व थाळीफेक इत्यादी मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आलेले आहे असे मत...
शबनम न्युज | आळंदी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरद चंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव आळंदी या ठिकाणी उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्रातर्गत शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय व चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट, लिमिटेड अहमदनगर यांच्याबरोबर सामंजस्य करार, उद्योजकता विकास विभागाचे उदघाटन आणि ” उद्योजकता विकास : एक दिवशीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व वैष्णवी पांचाळ, काजल पवार आणि विशाखा म्हसतकर यांच्या स्वागत गीताने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. डॉ. राजू शिरसकर यांनी उद्योजकता विकास विभाग स्थापन करण्यामागची भूमिका, उद्देश व ध्येय याबाबत माहिती सांगितली.तसेच पारंपारिक उद्योग यांची जपवणूक करून कौशल्यावर आधारित उद्योग व्यवसायांची निर्मिती करण्यासाठी या शिबिराचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले आहे असे मत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. कैलास अस्तरकर यांनी करून दिला. यावेळी महाविद्यालयातील आजी व माजी विद्यार्थी बळवंत मोरे, शुभम तापकीर, ओंकार बनसोडे, वैभव काटे, सुजित लोखंडे, ज्ञानेश्वर शिंगाडे, सिद्धार्थ पाटील, हेमंत आल्हाट, अनिकेत कुऱ्हाडे, शंतनु पोफळे,भारत कदम,संकेत कुऱ्हाडे, नाना अंबुरे, अक्षय कुऱ्हाडे, अक्षय काशिद या विविध उद्योग व व्यवसाय सुरु करणाऱ्या युवा उद्योजकाचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटक व प्रमुख व्याख्याते मा. श्री. अमित मखरे (Founder &CEO Chawadi ) यांनी चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रा. लि.अहमदनगर हे भारतातील उद्योजकता विकासावर मार्गदर्शन करणारे भारतातील पहिले डिजिटल ट्रेनिंग सेंटर आहे असे मत व्यक्त करीत इयत्ता दहावी म्हणजे करिअरला कलाटणी देणारे वर्ष असून कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अपमान सहन करण्याची ताकद व जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे मत मांडले. कोणताही उद्योग करताना प्रथम मन हे खंबीर असणे आवश्यक असून त्याला प्रयत्नाची जोड व सहनशीलता असावी लागते तसेच कोणताही व्यवसाय करताना त्या व्यवसायाची पार्श्वभूमी, सर्वेक्षण, निर्णय व समायोजन अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या आवडीला व्यवसायात रूपांतरित करणे म्हणजे उद्योग सुरू करणे होय. व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी, समस्या समोर येतात परंतु त्यावर योग्य तो तोडगा काढून आपले ध्येय निश्चित करणे म्हणजेच यशस्विता होय. पारंपारिक उद्योग व आधुनिक उद्योग यासंदर्भात मत मांडताना मोठमोठे उद्योगपती कशाप्रकारे निर्णय घेतात व यशस्वी होतात या संदर्भात अनेक उद्योगपतींचे दाखले देत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी उद्योग क्षेत्रात अनेक पर्याय असून ते आपल्या आवडीने स्वीकारावे करावे लागतात असे मत व्यक्त करीत तुम्ही जो उद्योग व्यवसाय सुरु करणार आहात त्यासाठी मी व चावडी ट्रेनिंग सेंटर नेहमी तुमच्या सोबत आहोत असे विद्यार्थ्यांना आश्वासन देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला चावडी ट्रेनिंग सेंटरचे मा. पंकज गोंडकर मा. प्रदीप सोनवणे, मा.सुयोग सोनवणे, मा. योगेश मानगुंडे तसेच महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पांडुरंग मिसाळ,प्रा. संजीव कांबळे, प्रा. माणिक कसाब, प्रा.शाहूराज येवते, प्रा.शैला वाळुंज, प्रा. डॉ. छाया जोशी, प्रा.डॉ. रणजित कदम, प्रा. विकास दिघे, प्रा. यशोदा खुळखुळे, प्रा. सविता मानके, प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. सोनाली अभंग, प्रा. विश्वनाथ व्यवहारे इत्यादी विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप बारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. परमेश्वर भत्ताशे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली....
शबनम न्युज | आळंदी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव आळंदी या ठिकाणी “23 एप्रिल जागतिक इंग्रजी दिन” दिवसाचे औचित्य साधून इंग्रजी विभागाअंतर्गत ऑनलाइन एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळे अंतर्गत ” Improve Your English” या विषयावर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून देताना महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. छाया जोशी यांनी इंग्रजी भाषेचे महत्व व काळाची गरज लक्षात घेऊन कार्यशाळेच्या विषयाची निवड करण्यात आली तसेच व्याख्यानातील मार्गदर्शन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले. पाहुण्यांचा परिचय करून देताना त्यांचयससाधे, अभ्यासू व चिकित्सक व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करताना “Dr. Anand Kulkarni as man of words and an ocean of knowledge.” असे वर्णन केले. या कार्यशाळेचे उदघाटन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी इंग्रजी भाषा अवगत करण्यासाठी लिहिणे,वाचणे, ऐकणे व बोलणे ही चार कौशल्य महत्त्वपूर्ण असून जर भाषेला आपलेसे करायचे असेल तर वरील कौशल्यांचा सराव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ इंग्रजी भाषाच नाही तर मराठी व हिंदी या भाषेवर सुद्धा प्रभुत्व मिळवता आले पाहिजे असे मत व्यक्त करीत भाषा अवगत करताना त्या भाषेचा शब्द साठा जास्तीत जास्त वाढवून ती रोजच्या वापरात आणणे आधुनिक काळात नितांत गरजचे आहे असे प्रतिपादन केले. या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे डॉ. आनंद कुलकर्णी इंग्रजी विभाग प्रमुख – कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव, पुणे यांनी 21 व्या शतकात इंग्रजी भाषेची गरज व त्याचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. कोणतीही भाषा शिकण्याची प्रक्रिया प्रवासा सारखी असून इंग्रजी भाषा शिकत असताना ती समजून घेणे, तिचा सराव करणे व दैनंदिन जीवनात वापरात आणणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. कोणती भाषा शिकतांना तिच्यावर प्रेम करणे ती अंगीकृत करणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषेच्या कौशल्यावर विवेचन करताना त्यांनी महाराष्ट्राची पार्श्वभूमी समोर ठेवून पंढरीच्या विठ्ठलाचे उदाहरण दिले. ज्याप्रमाणे विठ्ठलाचा सर्वत्र वास आहे त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेचे अस्तित्व सर्वत्र आहे असे मत मांडले. भाषा शिकताना चुका होतात पण त्या चुका दुरुस्त करून त्या भाषेवर कसे प्रभुत्व मिळवता येईल यावर विविध उदाहरणासह सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेसाठी प्रा. संजीव कांबळे, प्रा.शैला वाळुंज, प्रा, परमेश्वर भत्ताशे, प्रा. कैलास अस्तरकर ,प्रा.डॉ. रणजित कदम, प्रा. शाहूराज येवते,प्रा. विकास दिघे, प्रा. यशोदा खुळखुळे, प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. सोनाली अभंग, प्रा. डॉ. राजू शिरसकर,श्री.प्रवीण भावे इत्यादी विभाग प्रमुख,सहाय्यक प्राध्यापक,महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच इतर राज्यातील प्राध्यापक, शिक्षक,संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन व स्वागत प्रा. विश्वनाथ व्यवहारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. प्रविण डोळस यांनी मानले अशी माहिती प्रा. माणिक कसाब यांनी दिली....
शबनम न्यूज : आळंदी (दि.२७ एप्रिल) :- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव आळंदी या ठिकाणी, महाराष्ट्र...
शबनम न्यूज : आळंदी (दि.२६ एप्रिल) :- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव आळंदी या ठिकाणी स्पर्धा परीक्षा...